Skip to main content

सरफ़रोशी की तमन्ना ११ जून

अगदी सहजतेने मनातील देशभक्ती शायरीच्या आणि लेखणी च्या माध्यमातून उतरवणारे, तितक्याच निपुणतेने इंग्रजांविरुद्ध बंदूक चालवणारे रामप्रसाद बिस्मिल यांचा आज जन्मदिन.

लेखणी आणि बंदूक हे दोन्ही परस्परविरोधी शस्त्र सहसा एकत्रित येऊ शकत नाहीत. पण बिस्मिल अपवाद होते. क्रांतीकारकांना शस्त्रास्त्रे विकत घेण्यासाठी आणि हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (HRA) ही संघटना चालविण्यासाठी पैश्याची गरज होती. बिस्मिल शायरी आणि पुस्तके लिहून प्रसिद्ध करायचे आणि त्यातून येणाऱ्या मिळकतीने संघटनेसाठी शस्त्र खरेदी करीत होते.
मागितल्याने स्वातंत्र्य मिळणार नाही त्यासाठी रक्त सांडवणे गरजेचे आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे हेच एकमेव ब्रीद मानणारी ही संघटना होती.

इंग्रज सरकारला जबर धक्का द्यायचा म्हणून 1925 मध्ये काकोरी रेल्वे लूट घडवून आणली. याच घटनेतील मुख्य आरोपी म्हणून बिस्मिलला इंग्रज सरकारने फाशी दिली.

वक़्त आने दे बता देंगे तुझे ऐ आसमाँ।
हम अभीसे क्या बताये क्या हमारे दिलमें है।सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिलमे है।
देखना है जोर कितना बाजू ए महफ़िल में है।

प्रसिद्ध शायर बिस्मिल अजीमाबादी यांची ही शायरी म्हणत फासाच्या तख्तावर हसत हसत चढणाऱ्या बिस्मिलच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नव्हता.

बिस्मिलच्या कविता आजही मनाला क्रांतिकारक भुरळ पाडतात.
मिट गया जब मिटनेवाला
फिर सलाम आया तो क्या।
दिलकी बर्बादी के बाद
उनका पयाम आया तो क्या।

रामप्रसाद बिस्मिल 130 कोटी भारतीयांच्या मनात सदैव स्मरण राहतील. 

सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल मे है देखना है ज़ोर कितना बाज़ु-ए-कातिल मे है।। 
✍️

Popular posts from this blog

ATALJI- THE GREAT LEADER

आज भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींजी यांचा जन्मदिवस. ---------------------------------------- वाजपेयीजींच्या कवितांच्या काही ओळी..... जो जितना उँचा, उतना एकाकी होता है, हरभार को स्वयं ढोता है, चेहरे पर मुस्काने चिपका, मन ही मन रोता है|       धरती को बौनो की नाहीं,  उँचे कद के इंसानो की जरुरत है| इतने ऊँचे की आसमान छू लें,नये नक्षत्रों मे प्रतिभा की बीज बो लें,      किंन्तु इतने ऊँचे भी नहीं,      कि पाँव तले दूब ही न जमे,      कोई काटा न चुभे,      कोई कली न खिले| मेरे प्रभु! मुझे इतनी उँचाई कभी मत देना, गैरों को गले न लगा सकूँ, इतनी रुखाई मत देना| अटल बिहारी वाजपेयींजी ----------***---------***------- हम पडाव को समझे मंजिल लक्ष्य हुआ आँखों से ओझल वर्तमान के मोहजाल में आने वाला कल न भुलाएँ आओ फिर से दिया जलाएँ आहुती बाकी यज्ञ अधुरा  अपनों के विघ्नों ने घेरा अंतिम जय का वज्र बनाने नव दधीचि हड्डियां गलाएँ आओ फिर से दिया  जलाएँ, -------***--------***-------- भारत जमीन का टुकडा नहीं...

कॅप्टन विक्रम बत्रा

विषय :-कॅप्टन विक्रम बत्रा भारतीय सैन्याच्या अदम्य साहसाचा अनेक कहाण्या आहेत ज्याने,काही क्षणासाठी का होईना आपण भारावून जातो!हि अशीच एक कहाणी अश्या एक सैनिकाची ज्याचे नाव घेतले कि आजहि आपोआप ओठावर बोल येतात,'ये दिल मांगे मोर'. हि कहाणी आहे कॅप्टन विक्रम बत्रा यांची! ९ सप्टेंबर १९७४ साली हिमाचल मध्ये कमल कांत आणि गिरिधारी लाल बत्रा यांच्या पोटी विक्रम चा जन्म झाला आणि बरोबर १४ मिनिटाने विशाल म्हणजे विक्रम च्या जुळ्या भावाचा जन्म झाला ,विक्रम अगदी लहानपणा पासून त्यांच्या शाळेत एक हुशार आणि प्रत्येक गोष्टी मध्ये उत्सहाने भाग घेणारा विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता.उत्तर भारतातील सर्वोत्तम NCC कॅडेट म्हणून त्याने नाव अगदी लहानपणीच कमावले आणि वयाच्या १२ व्या वर्षी कराटे मध्ये ग्रीन बेल्ट सुद्धा मिळवला विक्रम हा राष्ट्रीय पातळीचा टेनिस पटू सुद्धा होता. लहानपणा पासून देशभक्त असलेल्या विक्रम ने आर्मी जोईन करायचे ठरवले आणि त्याने CDS हि परीक्षा दिली. विक्रम च्या बॅचलर डिग्री वर त्याला हाँग कोन्ग स्थित मर्चन्ट नेव्ही च्या कंपनीत भरपूर पगार असलेली नोकरी लागली होती ...