Skip to main content

कापूर (Camphor)- शुद्धता

कापूर म्हणजे नेमकं काय? कुठुन येतो कापुर?


अजूनही 60-70% लोकांना माहीतच नाही की कापूर हा झाडाला येतो. हा डिंक ही असतो आणि बाष्पीभवन प्रक्रियेतून +
सुद्धा मिळवता येतो. जो डिंक प्रकार असतो तो बाष्पीभवनाचा प्रक्रियेपेक्षा कमी शुद्ध असतो.
कापूर मूलतः आशिया खंडातली वनस्पती आहे जी भारतासह जपान, चीन, जावा,सुमात्रा बेटे आणि इंडोनेशिया इथे मुबलक प्रमाणात मिळतअसे. भारत हा कापूराचा उद्गाता म्हणुन ओळखला जातो. वैद्यगुरु धन्वंतरी आणि +
ऋषी चरकांनी सर्वप्रथम कापूर हा औषधींमध्ये वापरला आणि नंतर तो घरोघरी त्याचा वापर सुरु झाला.
आज आपल्याला कापुर भारतात आढळत का नाही? त्याचे मुख्य कारण आहे परकीय आक्रमणे आणि सोबतच त्यांनी आणलेले शोभेची झाडे जशी गुलमोहर आणि निलगिरी (हे दोन्ही झाडे दलदलीच्या प्रदेशातली आणि ह्यांचा +
उपयोग दलदलीची जमीन सुपीक करणे होय) इंग्रजांना निळ रबर आणि चहासाठी बागायती जमिनी तयार करून घ्यायचे काम ह्या झाडांनी केले आणि आपण भारतीय कुणाचीही कॉपी करायला सर्वात पुढे हे वेगळे सांगायला नकोच (माफी असावी पण हे सत्य आहे) तर आपणही ते सुरू केले आणि महाकाय झाडे जशी कापूर, वड आणि +
पिंपळ ह्यांची कत्तल सुरु केली आणि त्यातूनच कापूर नामशेष झाला. तरी जपान, सुदान, जावा, सुमात्रा आणि इंडोनेशिया ह्या देशांनी मात्र कापूर जोपासला आणि आज आपण बघतो तिथले वातावरण आपल्यापेक्षा कित्येक पटीने शुद्ध आणि व्हायरस मुक्त आहे.
कापूर ज्याचे वैज्ञानिक नाव Cinnamomum Camphora आहे +
त्यालाच Camphor Tree, Camphor Laure, Camphortree, Japanese Camphor, Chinese Sassafras Tree ह्या नावांनी देखील ओळखले जाते.कापूर हा सदाहरित (बारा महिने हिरवा असणारा वृक्ष) वृक्षांमधून एक आहे आणि संबंध बुंधा त्याचा एकत्र असतो.सरासरी उंची 12 ते 15 मीटर असते साधारणतः 30 ते 40 फूट) +
आणि घेरा 3 ते 4 फुटांचा असतो. कापूराचा इतका अवाढव्य पसारा आहे (म्हणून मी तुम्हाला सांगतो की त्यासाठी जागा खूप हवी. तुम्ही हे झाड कुंडीत किंवा गच्चीवरच्या बागेत लावू शकत नाही) अतिशय झटपट वाढणारा हा वृक्ष दोन ते अडीच वर्षात पूर्ण वाढतो.

एप्रिल-मे हा त्याच्या हंगाम असतो,+
जेव्हा त्याला फुले लागायला सुरवात होते आणि हिवाळ्यात फलोत्पादन ते सुद्धा कापुराचा आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यात (म्हणजेच 7 वर्षानंतर) सुरु होते.आता आपण बघुयात कापुर साठी लागणारी भौगोलिक परिस्थितीपाण्याचा व्यवस्थित निचरा होणारी जमीन तसेच थोड्या प्रमाणात क्षारयुक्त जमीन ही कापूर +
लागवडीसाठी योग्य जमीन असते. सुरूवातीचे काही दिवस कापराची व्यवस्थित निगा घ्यावी लागते नंतर निगा राखण्याची तितकीशी गरज नसते. कापूर वृक्षाचे वय हा एक शोधाचा विषय आहे. त्याचे सरासरी वय जरी मानवाइतके असले तरी जगाच्या पाठीवर हजारो वर्षे जुने कापूर झाड सुद्धा आहे. त्यातले एक झाड +
जपान इथे असून त्याचे वय सध्या 1500 वर्षे आहे. ज्याला जपानी लोकांनी The Great Capmhor of Kamo हे नाव सुद्धा दिले आहे.
चित्र क्रमांक 2 मध्ये आपण जे खोडाचे चित्र बघत आहोत ते पूर्ण वाढ झालेल्या खोडाचे आहे त्याचा रंग राखाडी असतो.
चित्र क्रमांक 3 मध्ये त्याच्या फुलांचे चित्र जे की +ImageImage
सुगंधाने उग्र असतो आणि पांढऱ्या रंगात असतो.....
चित्र क्रमांक 4 मध्ये त्याची पाने आहेत जे रंगाने गडद हिरव्या रंगाचे असतात.
माझ्या असेही वाचनात आले की 'कापूर हा ज्वालाग्राही असल्यामुळे झाड लवकर पेट घेते' मला सुरवातीला हसू आले. महितीअभावी खूप काही अफवा कापराबद्दल प्रसिद्ध आहेत +Image
आहेत. पण इथे सांगू इच्छितो की,कापुर ज्वालाग्राही आहे परंतु त्याला कमीतकमी 48℃ इतके तापमान लागते. पेट घ्यायला आणि कापराला कमी तापमान सहन होत नाही म्हणजेच उणे 3℃ ते उणे 4℃ मध्ये त्याची लागवड होत नाही.चित्र क्रमांक 5 मध्ये कापुराचे फळ आहे. गडद काळ्या रंगाचे जे प्रजनन उत्पती +Image
नंतर यायला सुरुवात होते. उंच आणि दाट फांदी तसेच पानांमुळे कापुर हा सावली देण्यात उत्तम असा वृक्ष आहे. तुम्ही कधीही कापूराचा झाडाखाली जाऊन बसा तुम्हाला प्रसन्नच वाटेल. सदाहरित असल्यामुळे कापूर हा तुळशीच्या खालोखाल ऑक्सिजन देणारा आणि वादळात सुद्धा मजबूत असा वृक्ष आहे.जसे मी वरती +
बोललो आयुर्वेदात कापूराचे भरपूर उपयोग आहेत.भरपूर असे प्रसंग आहेत, जिथे आपल्याला कापूराचा उल्लेख आढळतो. आजच्या आयुष्यात सुद्धा तांबूल बनवताना किंवा तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडवात ह्या कापुराचा उपयोग होतो.कापुर हा उत्तम नैसर्गिक वेदनाशामक तसेच भुलीसाठी वापरण्यात +
असुन कापूर तुम्हाला तुमच्या बऱ्याच श्वसनाच्या आजारात फायदेशीर आहे.त्याचे कारण म्हणजे कापूरातून मिळणारा ऑक्सिजन जर तुमचा श्वास भरून येत असेल अथवा दमा झाला असेल तर कापूर हा संजीवनी आहे. त्यासोबतच कापूराचा उल्लेख 9 मृतसंजीवनीमध्ये केला जातो. जे माणसाचे आयुष्य वाचवायचे साहस ठेवतात +
असा हा कापूर सर्दी, खोकला, दमा, विषप्रयोग,निद्रानाश वेदनाशामक आणि अश्या बऱ्याच गोष्टींमध्ये उपयोगी आहे आणि सध्या त्याचा उपयोग अरोमा थेरपीमध्येसुद्धा सुरु केला आहे. कापुराचे खोड मजबुत तसेच टिकाऊ असते त्यामुळे कापूराच्या लाकडाचा उपयोग घर बनवण्यासाठी सुद्धा होतो. तसेच कापूर तेलाचा +
उपयोग आपल्या वेगवेगळ्या सौंदर्यप्रसाधने तसेच मेडिकल सेक्टर मध्ये सुद्धा केला जातो आणि जपानमध्ये तर ते साबणामध्ये सुद्धा याचा वापर करतात.आता ह्याचे नुकसान आणि ह्याला कुठे लावावे याबद्दल थोडे बोलूया कापूर हा आकाराने अवाढव्य असल्यामुळे घराच्या शेजारी अथवा कॉलोनीमध्ये अथवा आपल्या +
अपार्टमेंटमध्ये अथवा गच्चीवर कुंडीत लावता येत नाही. मुळे पार 20 ते 30 फुटांपर्यंत वाढत जाऊन 100 ते 200 फुटांपर्यंत जाऊ शकतात. त्यामुळे तुमच्या घराला नुकसान होऊ शकते. तसेच याची अति उंची तुम्हाला मिळणाऱ्या सुर्यप्रकाशामध्ये अडथळा निर्माण करतो.कापूराचा सहभाग सिडेटिव्ह ड्रगमध्ये +
होतो म्हणून याचा प्रत्यक्ष उपयोग टाळायला हवा. जर तो अति झाला तर तुम्हाला विषबाधा होऊ शकते.
तर कापूर हा आपण कुठे लावावा याचे उत्तर अगदी सोपे आहे. डोंगर, सार्वजनिक बागा, शेत इथे आपण याची लागवड करू शकतो. शेतकऱ्यांसाठी हा एकदम चांगला जोडधंदा आहे. परंतु एक आहे... मित्रानो,+
एक कापूराचे झाड कमीतकमी अर्धा किलोमीटरचा परिसर शुद्ध ठेवतो आणि एक झाड आजूबाजूला असेल तर छोटे मोठे किडे कीटक, डास, मुंग्या आणि उंदीर लांब राहतात आणि तुम्हाला नवचैतन्य देतो.

तर असा हा बहुगुणी कापूर हा सदाहरित वृक्ष आणि निसर्गाची मदत करणारा सध्या झपाट्याने कमी होतोय +
कारण एकच मानवी हस्तक्षेप... याला आपण थांबवायला हवे.

चित्र क्रमांक 1: कापुर झाड पूर्ण वाढलेले
चित्र क्रमांक 2: कापुराचा खोड
चित्र क्रमांक 3: कापुराचे फुल
चित्र क्रमांक 4: कापुराचे पान
चित्र क्रमांक 5: कापुराचे फळ

दिनेश कोल्हारे
7620675754

Popular posts from this blog

ATALJI- THE GREAT LEADER

आज भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींजी यांचा जन्मदिवस. ---------------------------------------- वाजपेयीजींच्या कवितांच्या काही ओळी..... जो जितना उँचा, उतना एकाकी होता है, हरभार को स्वयं ढोता है, चेहरे पर मुस्काने चिपका, मन ही मन रोता है|       धरती को बौनो की नाहीं,  उँचे कद के इंसानो की जरुरत है| इतने ऊँचे की आसमान छू लें,नये नक्षत्रों मे प्रतिभा की बीज बो लें,      किंन्तु इतने ऊँचे भी नहीं,      कि पाँव तले दूब ही न जमे,      कोई काटा न चुभे,      कोई कली न खिले| मेरे प्रभु! मुझे इतनी उँचाई कभी मत देना, गैरों को गले न लगा सकूँ, इतनी रुखाई मत देना| अटल बिहारी वाजपेयींजी ----------***---------***------- हम पडाव को समझे मंजिल लक्ष्य हुआ आँखों से ओझल वर्तमान के मोहजाल में आने वाला कल न भुलाएँ आओ फिर से दिया जलाएँ आहुती बाकी यज्ञ अधुरा  अपनों के विघ्नों ने घेरा अंतिम जय का वज्र बनाने नव दधीचि हड्डियां गलाएँ आओ फिर से दिया  जलाएँ, -------***--------***-------- भारत जमीन का टुकडा नहीं...

कॅप्टन विक्रम बत्रा

विषय :-कॅप्टन विक्रम बत्रा भारतीय सैन्याच्या अदम्य साहसाचा अनेक कहाण्या आहेत ज्याने,काही क्षणासाठी का होईना आपण भारावून जातो!हि अशीच एक कहाणी अश्या एक सैनिकाची ज्याचे नाव घेतले कि आजहि आपोआप ओठावर बोल येतात,'ये दिल मांगे मोर'. हि कहाणी आहे कॅप्टन विक्रम बत्रा यांची! ९ सप्टेंबर १९७४ साली हिमाचल मध्ये कमल कांत आणि गिरिधारी लाल बत्रा यांच्या पोटी विक्रम चा जन्म झाला आणि बरोबर १४ मिनिटाने विशाल म्हणजे विक्रम च्या जुळ्या भावाचा जन्म झाला ,विक्रम अगदी लहानपणा पासून त्यांच्या शाळेत एक हुशार आणि प्रत्येक गोष्टी मध्ये उत्सहाने भाग घेणारा विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता.उत्तर भारतातील सर्वोत्तम NCC कॅडेट म्हणून त्याने नाव अगदी लहानपणीच कमावले आणि वयाच्या १२ व्या वर्षी कराटे मध्ये ग्रीन बेल्ट सुद्धा मिळवला विक्रम हा राष्ट्रीय पातळीचा टेनिस पटू सुद्धा होता. लहानपणा पासून देशभक्त असलेल्या विक्रम ने आर्मी जोईन करायचे ठरवले आणि त्याने CDS हि परीक्षा दिली. विक्रम च्या बॅचलर डिग्री वर त्याला हाँग कोन्ग स्थित मर्चन्ट नेव्ही च्या कंपनीत भरपूर पगार असलेली नोकरी लागली होती ...

सरफ़रोशी की तमन्ना ११ जून

अगदी सहजतेने मनातील देशभक्ती शायरीच्या आणि लेखणी च्या माध्यमातून उतरवणारे, तितक्याच निपुणतेने इंग्रजांविरुद्ध बंदूक चालवणारे रामप्रसाद बिस्मिल यांचा आज जन्मदिन. लेखणी आणि बंदूक हे दोन्ही परस्परविरोधी शस्त्र सहसा एकत्रित येऊ शकत नाहीत. पण बिस्मिल अपवाद होते. क्रांतीकारकांना शस्त्रास्त्रे विकत घेण्यासाठी आणि हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (HRA) ही संघटना चालविण्यासाठी पैश्याची गरज होती. बिस्मिल शायरी आणि पुस्तके लिहून प्रसिद्ध करायचे आणि त्यातून येणाऱ्या मिळकतीने संघटनेसाठी शस्त्र खरेदी करीत होते. मागितल्याने स्वातंत्र्य मिळणार नाही त्यासाठी रक्त सांडवणे गरजेचे आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे हेच एकमेव ब्रीद मानणारी ही संघटना होती. इंग्रज सरकारला जबर धक्का द्यायचा म्हणून 1925 मध्ये काकोरी रेल्वे लूट घडवून आणली. याच घटनेतील मुख्य आरोपी म्हणून बिस्मिलला इंग्रज सरकारने फाशी दिली. वक़्त आने दे बता देंगे तुझे ऐ आसमाँ। हम अभीसे क्या बताये क्या हमारे दिलमें है।सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिलमे है। देखना है जोर कितना बाजू ए महफ़िल में है। प्रसिद्ध शायर बिस्मिल अजीमाबाद...